नागपूर – दसरा मेळाव्यामध्ये काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल करायचा असल्याचे म्हटलं होतं यावर प्रत्युत्तर देताना आज विरोधी पक्षाचे असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगालमध्ये कोणताच उद्योग टिकत नाही , विरुद्ध बोलत असणाऱ्यांना ठार मारलं जातं . मग याच प्रकारची परिस्थिती त्यांना महाराष्ट्र मध्ये निर्माण करायची आहे का ? जोवर आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब उरलेला आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊच देणार नाही , महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहील असे त्यांनी म्हटले .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघराज्य या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसत आहे . काही डाव्या पक्षांच्या सोबतीने त्यांनी भारताचे संविधान बदलण्याचा प्लॅन आखला आहे मात्र आम्ही हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे .