इतर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत; ३१.६४ लाख शेतकऱ्यांना दिलासा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत; ३१.६४ लाख शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : राज्यात मे महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१.६४ लाख शेतकऱ्यांना एकूण २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित होते.

खरीप २०२५ मधील नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर झाला असून, पहिल्या टप्प्यातील मदत विविध जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

जिल्हानिहाय मदत (कोटी रुपयांत)

हिंगोली : ३.०४ लाख शेतकरी बाधित; २३१.१८ कोटी मदत

बीड : १.१४ लाख शेतकरी बाधित; ५६.७४ कोटी मदत

धाराशिव : २.३४ लाख शेतकरी बाधित; १८९.६१ कोटी मदत

लातूर : ३.८० लाख शेतकरी बाधित; २.३५ कोटी मदत

नाशिक : ७,१०८ शेतकरी बाधित; ३.८२ कोटी मदत

धुळे : ७२ शेतकरी बाधित; २ लाख मदत

नंदुरबार : २५ शेतकरी बाधित; १ लाख मदत

जळगाव : १७,३३२ शेतकरी बाधित; ९.८६ कोटी मदत

अहिल्यानगर : १४० शेतकरी बाधित; ६ लाख मदत

राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांसाठी मदत दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button