जळगांव

मेहरूण तलावात शाळकरी विद्यार्थी बुडाला, तिघे बचावले

खान्देश टाइम्स न्यूज | २९ डिसेंबर २०२३ | जळगाव शहरातील मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शाहू नगरातील एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुदैवाने तिघांना वाचविण्यात यश आले. ईशान शेख वसीम (वय-११, रा.शाहू नगर) असे मयत बालकाचे नाव आहे.

जळगावातील शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख वसीम, मोईन खान अमीन खान (वय- १३), अयान तस्लीम भिस्ती (वय-१३) व असलम शेख सलाउद्दीन (वय-१३) सर्व रा. शाहूनगर, जळगाव हे चौघे जण शुक्रवार दि.२९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. यावेळी चौकांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले मात्र ईशान शेख वसीम या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेऊन ईशान शेख वसीमचा मृतदेह बाहेर काढला. मृताच्या आप्तांनी मेहरून तलाव आणि जिल्हा रुग्णालय परिसरात प्रचंड आक्रोश केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button