
फवारणी करतांना विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील धामणगाव शिवारातील घटना
जळगाव धामणगाव शिवारातील शेतात फवारणी करतांना विषबाधा झालेल्या किशोर अभिमान तायडे (वय ५२, रा. धामणाव) यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा गुरूवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील धामणगावात किशोर तायडे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ते शेतात पिकांवर फवारणी
उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत
करत असतांना त्यांना विषबाधा झाली. या विषबाधामुळे त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उचार सुरू असतांना गुरूवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी बेबाबाई, ललित आणि जयवंत ही दोन मुले, भाऊ राजू असा परिवार आहे