
जळगावच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे सत्कार
महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने जिल्ह्याचा गौरव; प्रामाणिकपणा, शिस्तीचे कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने १०० दिवसांच्या कामगिरीच्या आढाव्यात जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ‘सर्वोत्तम जिल्हाधिकारी’ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना ‘सर्वोत्तम पोलीस अधीक्षक’ म्हणून गौरवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे दोन्ही अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कारप्रसंगी फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली यांनी, “जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनतीमुळे जळगाव जिल्ह्याचा लौकिक वाढला आहे. त्यांच्या कार्यामुळे देश आणि समाजसेवेत मोलाचा हातभार लागत आहे,” असे गौरवोद्गार काढले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत जिल्ह्याच्या प्रगतीत त्यांचे योगदान कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.सत्कार समारंभात फाउंडेशनचे हाजी शेख सलीमुद्दीन, हाजी शकुर बादशाह, शेख जमील, कामिल खान, अमान बिलाल, शफी शेख, मेहमूद मनियार, नासिर खान, शेख अयान आदी सदस्य उपस्थित होते. या घटनेने जळगाव जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण पसरले आहे.