खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

जळगाव महापालिकेची कारवाई : शहरातील ३५ अतिक्रमणे हटवली

जळगाव महापालिकेची कारवाई : शहरातील ३५ अतिक्रमणे हटवली

जळगाव : शहरातील वाहतूक आणि नागरी सुविधांवर ताण निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने सोमवारी (२७ मे) धडक कारवाई करत एकूण ३५ अतिक्रमणे हटवली. या कारवाईत लोटगाड्या, टपऱ्या, खुर्च्या, बाके तसेच इतर अडथळा निर्माण करणारे साहित्य हटवण्यात आले.

महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार आणि प्रभाग क्रमांक १चे अधिकारी उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम राबवली. कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, चौबे शाळा, महर्षी दधिची चौक, शिवाजीनगर पूल, नेरी नाका, चित्रा चौक ते कोर्ट परिसर आदी भागांत ही कारवाई करण्यात आली.

संजय ठाकूर, संजय पाटील, नाना कोळी, साजीद अली, शेखर ठाकूर, सलमान भिस्ती, भानू ठाकरे, नितीन भालेराव, दीपक कोळी यांनी  ही कारवाई केली.

शहरातील रस्ते मोकळे ठेवून नागरी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महापालिकेने उचललेले हे पाऊल सकारात्मक असून, नागरिकांतून या कारवाईला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button