खान्देशजळगांवसामाजिक

बारावीचा निकाल जाहीर : जळगाव जिल्ह्याचा 94.54% यशस्वी निकाल

बारावीचा निकाल जाहीर : जळगाव जिल्ह्याचा 94.54% यशस्वी निकाल

पालकमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर झाला. जळगाव जिल्ह्याने 94.54% उत्तीर्णतेसह उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.जिल्ह्यातून 44,736 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 42,295 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक विभागाचा एकूण निकाल 91.31% असून, नाशिक जिल्हा 95.61% उत्तीर्णतेसह प्रथम, तर जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. धुळे जिल्ह्याचा निकाल 74.88% आणि नंदुरबारचा 86.62% राहिला.पालकमंत्र्यांचा संदेश
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा! अपयशी विद्यार्थ्यांनी निराश न होता आत्मविश्वासाने पुन्हा प्रयत्न करावेत. मेहनत आणि संयमाने यश नक्की मिळेल,” असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन त्यांनी केले.गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन
विद्यार्थी 6 मे ते 20 मे 2025 या कालावधीत गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासोबत शुल्कही ऑनलाइन भरावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button