
वाढदिवसाचा आनंद फक्त चार तासांचा… देशसेवेसाठी जवान माघारी
ढेकू सिमच्या शांताराम सोनवणे यांची देशभक्ती भावुक करणारी
अमळनेर: देशात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुट्टीवर आलेल्या जवानांना तात्काळ देशसेवेसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अनेक जवानांना आपली वैयक्तिक कामे अर्धवट सोडून ड्युटीवर परतावे लागले आहे. अमळनेर तालुक्यातील ढेकू सिम येथील जवान शांताराम प्रताप सोनवणे (वय 42) हे मुलीच्या वाढदिवसासाठी खास सुट्टी घेऊन घरी आले होते. मात्र, अवघ्या चार तासांतच त्यांना ड्युटीवर परतण्याचा कॉल आला आणि त्यांना देशसेवेसाठी माघारी रवाना व्हावे लागले.शांताराम सोनवणे हे जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलात कार्यरत आहेत. मुलीच्या वाढदिवसासाठी ते गावी परतले होते. घरी पोहोचताच त्यांनी कुटुंबासह केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, चार तासांचा आनंद लुटत असतानाच त्यांना भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे तात्काळ ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश मिळाले. त्यांनी लगेचच सामान आवरले आणि देशसेवेसाठी रवाना झाले.शांताराम यांची मुलगी वडिलांच्या आगमनाने आनंदात होती, पण वडिलांना फक्त चार तासांसाठीच भेटता आले. तरीही कुटुंबाने वाढदिवस उत्साहात साजरा केला. “ज्या भूमीने मला जन्म दिला, त्या भूमीचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे,” असे शांताराम यांनी सांगितले. देशसेवेला प्राधान्य देत त्यांनी कुटुंबाला निरोप देऊन ड्युटीवर रुजू होण्याचा निर्णय घेतला.
अमळनेर (प्रतिनिधी): देशाच्या सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुट्टीवर घरी आलेल्या जवानांना तात्काळ सेवा स्थळी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील ढेकू सिम येथील जवान शांताराम प्रताप सोनवणे (वय ४२) यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घेतलेली सुट्टी अवघ्या चार तासांतच अर्धवट सोडून पुन्हा ड्युटीकडे धाव घेतली.
जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेले सोनवणे हे काही दिवसांसाठी गावी आले होते. घरी आल्यावर त्यांनी कुटुंबासह मुलीचा वाढदिवस साजरा केला, केक कापला, क्षणभर का होईना पण कुटुंबाच्या सहवासात आनंद लुटला. मात्र, आनंदाचे ते क्षण अवघे चार तासच टिकले. सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने त्यांना तात्काळ परतण्याचा आदेश मिळाला आणि ते बिना विलंब देशसेवेसाठी रवाना झाले.
“ज्या भूमीने मला जन्म दिला, तिचे रक्षण करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे,” असे उद्गार त्यांनी निघण्यापूर्वी कुटुंबीयांसमोर काढले. त्यांच्या या देशभक्तीच्या भावनेने कुटुंबीयही भावूक झाले. मुलीला वडिलांची भेट अवघ्या काही तासांसाठीच मिळाली, पण वडिलांच्या समर्पणाची आठवण आयुष्यभरासाठी मिळाली.
देशसेवेला प्राधान्य देत सोनवणे यांनी आपल्या वैयक्तिक आनंदाला बाजूला ठेवत सेवा बजावण्याचा घेतलेला निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.