इतर

रेल्वे प्रवाशांचे हरवलेले दागिने, लॅपटॉप, रोख रक्कम आरपीएफकडून परत

रेल्वे प्रवाशांचे हरवलेले दागिने, लॅपटॉप, रोख रक्कम आरपीएफकडून परत

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेली बॅग, त्यातील सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि रोख रक्कम असे ७० हजारांहून अधिक किमतीचे सामान भुसावळ रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) तत्परतेमुळे प्रवाशांना परत मिळाले. ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.हरवलेली बॅग परत
२१ मे रोजी ‘रेल मदत’ पोर्टलवर भाविका राहुल दामगोडे (वय ३५, रा. नवापाडा, शेलवली मनोर रोड, ठाणे) यांच्या बॅग हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. त्या झेलम एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०७७) मधून प्रवास करताना पुणे स्थानकावर उतरताना जनरल डब्यात बॅग विसरल्या होत्या. भुसावळ स्थानकावर गाडी येताच आरपीएफचे संतोष खेडेकर आणि अवधेश कुमार यांनी डब्यात शोध घेऊन बॅग ताब्यात घेतली. व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवून ३१ मे रोजी सहायक निरीक्षक ओ.पी. मीना यांच्या उपस्थितीत बॅग महिलेला सुपूर्द करण्यात आली.लॅपटॉप, ट्रॉली बॅगही परत
दुसऱ्या घटनेत, पटना जनता एक्स्प्रेस (गाडी क्र. १३२०२) च्या ई/३ डब्यात एका प्रवाशाचा अॅस्सू कंपनीचा लॅपटॉप आणि आकाशी निळ्या रंगाची ट्रॉली बॅग राहिली होती. माहिती मिळताच आरपीएफचे के.एस. वसावे आणि नरेंद्र गौतम यांनी तात्काळ डब्यात शोध घेऊन बॅग शोधली आणि ती प्रवाशाला परत केली.प्रवाशांमध्ये समाधान
हरवलेले मौल्यवान सामान मिळाल्याने प्रवाशांनी आरपीएफच्या कार्यशैलीचे कौतुक केले. प्रवाशांच्या सुरक्षेसह त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत करण्यात आरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘ऑपरेशन अमानत’मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button