खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

लोकसेवक स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण

लोकसेवक स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण

धनाजी नाना विद्या प्रबोधिनीत पुण्यतिथीनिमित्त सोहळा; मान्यवरांची उपस्थिती, कार्यकर्तृत्वाला अभिवादन

जळगाव | प्रतिनिधी

लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि न्याय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विचारांचा वारसा पुढे नेण्याचा विश्वास

अनावरणानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धनाजी नाना आणि स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला. शिरीषदादा चौधरी यांच्यानंतर धनंजय चौधरी हे हा सामाजिक व शैक्षणिक वारसा समर्थपणे पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच चौधरी आणि गवई कुटुंबातील जिव्हाळ्याच्या संबंधांनाही त्यांनी उजाळा दिला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘हा पुतळ्याचा नव्हे, विचारांचा अनावरण सोहळा’

कार्यक्रमाच्या प्रारंभी धनंजय चौधरी यांनी हा सोहळा केवळ पुतळ्याच्या अनावरणाचा नसून विचारांच्या अनावरणाचा असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव पी. आर. चौधरी यांनी प्रास्ताविकातून धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा मांडला.

कार्याचा गौरव

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्रांतीतील योगदानाचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी यांनी त्यांच्या कार्याचा वारसा सर्वजण एकत्रितपणे पुढे नेत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी स्व. चौधरी यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि भूदान चळवळीतील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांची आजही समाजाला प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले.

मोठ्या संख्येने उपस्थिती

कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले, तर उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button