सामाजिक

आषाढी एकादशीनिमित्त साई इच्छा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना भगर, आमटी व दुधाचे वाटप

आषाढी एकादशीनिमित्त साई इच्छा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना भगर, आमटी व दुधाचे वाटप

जळगाव l प्रतिनिधी l २५ जुलै २०२६ l आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना, जळगाव येथे एका सामाजिक उपक्रमातून भक्ती आणि सेवेचा सुरेख संगम पाहायला मिळाला. आषाढी एकादशीनिमित्त भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. या उपवासाच्या काळात रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड होऊ नये आणि त्यांच्या उपवासाचा खंड पडू नये, यासाठी ‘साई इच्छा फाउंडेशन’ च्या वतीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गरजू नातेवाईकांना फराळ वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या आरोग्याला पोषक असा ४० किलो भगर, गरमागरम आमटी, खजूर आणि दुधाचे वाटप करण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरला.

दानशूर व्यक्तींचे लाभले सहकार्य
या सामाजिक आणि भक्तिमय उपक्रमासाठी शहरातील काही दानशूर व्यक्तींनीही आपले मोलाचे योगदान दिले. साई इच्छा फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली शिरापुरे, सचिव आनंद शिरापुरे, डब्ल्यू. पी. जोशी, तसेच कस्तुरी शिरापुरे व इतर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून फराळ वाटपाचे नियोजन सांभाळले.

आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या भक्तीसोबतच रुग्णालयातील गरजूंची सेवा करणे, हीच खरी विठ्ठलसेवा आहे. या भावनेतूनच आम्ही हा उपक्रम राबवला, अशी प्रतिक्रिया यावेळी संस्थापकांकडून व्यक्त करण्यात आली. साई इच्छा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून व नागरिकांमधून विशेष कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button