खान्देशजळगांवदेश-विदेश

आनंदवार्ता : यंदा मान्सून १६ वर्षात प्रथमच ८ दिवस आधीच केरळात दाखल 

आनंदवार्ता : यंदा मान्सून १६ वर्षात प्रथमच ८ दिवस आधीच केरळात दाखल 

देशभरात पावसाचा अंदाज; पुढील काही दिवस ‘रेड’ व ‘ऑरेंज’ अलर्ट जारी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! नैऋत्य मान्सूनने यंदा आपल्या नियोजित वेळेच्या आठ दिवस आधीच म्हणजेच २३ मे रोजी केरळात दमदार हजेरी लावली आहे. भारतात मागील १६ वर्षांत एवढ्या लवकर मान्सूनचे आगमन प्रथमच झाले आहे.

सामान्यतः १ जूनच्या आसपास मान्सून भारतात प्रवेश करतो. मात्र यंदा हवामान विभागाने अधिकृत घोषणा करत शनिवारी (२४ मे) मान्सून केरळात दाखल झाल्याचे जाहीर केले. केरळच्या किनारपट्टीसह तमिळनाडू व कर्नाटकच्या काही भागांमध्येही मान्सूनचे आगमन लवकरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मान्सूनचे आगमन झाल्यानंतर केरळसह दक्षिण भारतातील काही भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

यंदा सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज

हवामान विभागाने यंदा अल निनो प्रभाव नसल्यामुळे देशात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अल निनोमुळे भारतात कमी पाऊस होण्याची शक्यता असते, मात्र यंदा तशी स्थिती नाही. मान्सूनची तीव्रता व विस्तार जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक हवामान स्थितींवर अवलंबून असतो, असे हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

कृषी, जलसाठे आणि वीजनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४२ टक्के जनता कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे सुमारे १८ टक्के योगदान आहे. त्यामुळे मान्सूनचे वेळेवर आणि भरपूर प्रमाणात आगमन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे जलसाठ्यांच्या पातळीत वाढ होऊन वीजनिर्मिती प्रकल्पांनाही चालना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button