जळगांवशासकीय

संततधार पावसाने खचली पोलीस अधीक्षक कार्यालयातील गटार

खान्देश टाइम्स न्यूज | २३ जुलै २०२३ | जळगाव शहरासह जिल्हयात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा काहीसा सुखावला आहे. संततधार पावसाने पोलीस अधीक्षक कार्यालय आवारातील गटार खचली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे. रावेर, यावल तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. बळीराजा देखील सुखावला आहे.

जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय मागील बाजूस असलेली गटार संततधार पावसाने खचली असून पूर्णतः बंद झाली आहे. गटारीच्या काठावर कोणतेही वाहन नसल्याने दुर्घटना टळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button