
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव प्रतिनिधी ज्य शासनाने जलसाक्षरता आणि नदी संवर्धनाचा जो ऐतिहासिक व क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला होता, आज त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत,” असा महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करत राज्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग आणि जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. राज्याच्या विकासात पाण्याचे नियोजन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर अत्यंत कळीचा मुद्दा बनला असून, याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण केल्याशिवाय जलसमस्या सुटणार नाही असे प्रतिपादन मॅगसेस पुरस्कार प्राप्त तथा जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी यांनी केले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली गिरणा नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘चला जाणूया नदीला’ या संदर्भात आयोजित बैठकीत राजेंद्र सिंह जी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, उपवनसंरक्षक सौरिश सहाय,अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी(रोहयो) मंजुषा घाटगे, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य नरेंद्र चौघ , गिरणा नदी समन्यवयक विशाल सोनकुळ, सोगर धनाड, प्रणील चौधरी, भोनक नदी समन्वय, तेजस पाटील, डोंगरी नदी समन्वयक, सवीता राजपूत शेखर निंबाळकर, तितुर नदी समन्वयक, प्रशांत गायकवाड बेलगंगा नदी समन्वयक, राजेंद्र सिंह पाटील, किरण पाटील, भराडी नदी समन्वयक, एकनाथ मातळकर मिलिंद देवकर यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलपुरुष राजेंद्र सिंहजी म्हणाले,महाराष्ट्र शासनाकडून आता महाराष्ट्र नदीसंवर्धन अभियान राबवण्यात येणार असल्याचे यांनी यावेळी नमूद केले.
*नदी संवर्धनासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येईल : जिल्हाधिकारी घुगे*
वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जलसाक्षरता अभियान तीव्र करण्यात आले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे काळाची गरज बनली असून जलसाक्षरता आणि नदी संवर्धनासाठी आवश्यकती शासकीय यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी जिल्हा स्तरावर दोन व प्रत्येक नदीसाठी एक शासकीय समन्वयक यांची नेमणूक करण्यात येईल असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले. सध्या अनेक भागांत भूजल पातळीत घट होत असल्याने प्रशासन जल संवर्धनावर विशेष भर देत आहे. या बैठकीत विविध नद्यांबाबत सद्यस्थिती व प्रकल्पांच्या सद्यस्थितीची बाबत नदीप्रहरी यांनी माहिती दिली. नदी पुनरुज्जीवन अहवालात आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
************




