
कामगार तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या दिवशी युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कुसुंबा येथे घडले असून या घटनेमुळे परिसरात चळवळ उडाले आहे
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा) हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत होता. गुढीपाडव्याच्या संध्याकाळी तो घरी परतल्यानंतर काही वेळाने वरच्या खोलीत गेला आणि गळफास घेत आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगावच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.